इयत्ता सातवी मध्ये असताना एका मुलीने तिच्या शिक्षिकेच्या सांगण्यावरून तिच्याच वर्गातील धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या मुली बरोबर शर्यत लावली आणि ती शर्यत त्या मुलीने जिंकली सुद्धा. पुढे जाऊन याच मुलीने भारताचे नाव धावण्याच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावले. महिलांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव चमकावणारी ही मुलगी म्हणजेच भारताची गोल्डन गर्ल पी. टी. उषा. भारताच्या क्रीडा इतिहासात आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या स्पर्धेत नावलौकिक मिळवून देणाऱ्या महिला खेळाडूंची संख्या खूप कमी होती. पण पी. टी. उषा यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडाक्षेत्रातील भारतीय महिलांची कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली
1964 मध्ये केरळ येथे पी. टी. उषा यांचा जन्म झाला. भारतीय समाजव्यवस्थेत त्यावेळी महिलांना दुय्यम स्थान होते. लहानपणापासूनच खेळाची आवड असलेल्या उषा यांनी धावणे या क्रीडा प्रकारात भाग घेत शालेय स्तरावर अनेक प्राविण्य मिळवले. 1977 मध्ये एका स्पर्धेच्या बक्षीस वितरण या त्यावेळचे अथलेटिक्सचे नामवंत प्रशिक्षक नांबियार आणि पी. टी. उषा यांची भेट झाली. पी. टी. उषा यांच्यातील गुण नांबियार यांनी हेरले आणि त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. 400 मीटर धावणे हा त्यांचा मुख्य इव्हेंट. त्यानंतर वेगवेगळ्या वयोगटाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उषा यांनी चमकदार कामगिरी केली.
पुढे 1980 मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. भारतातर्फे सर्वात कमी वयात ऑलम्पिक खेळणारी महिला खेळाडू म्हणून त्या या स्पर्धेत सहभागी झाल्या. या स्पर्धेत त्यांची कामगिरी चांगली झाली नाही. पण त्यानंतर 1984 लॉस एंजेलिस येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये 400 मीटर धावण्यात त्यांनी अंतिम फेरीत मजल मारली. भारतातर्फे धावण्याच्या स्पर्धेत मिल्खासिंग यांच्या नंतर अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. दुर्दैवाने अंतिम फेरीतील शर्यतीमध्ये त्यांचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. पण सर्व भारतीयांना आणि विशेषता भारतीय महिलांना अभिमान वाटावी अशी कामगिरी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केली होती.
भारतीय महिलांची सामाजिक स्थिती बदलण्यासाठी ज्या चळवळी झाल्या त्यामध्ये पी. टी. उषा यांच्या रूपाने तयार झालेली क्रीडा चळवळ अत्यंत महत्त्वाची होती. 1991 पर्यंत त्यांनी भारताला आशियाई स्पर्धा, कॉमनवेल्थ स्पर्धा आणि वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवून दिली. 1991 मध्ये त्यांनी खेळातून संन्यास घेतला. सामाजिक आणि कौटुंबिक बंधनात अडकलेल्या भारतीय महिलांसाठी त्यांनी एक नवीन आदर्श निर्माण केला. महिला क्रीडा चळवळीसाठी त्यांनी पोषक वातावरण तयार केले. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, मिताली राज, कर्णम मल्लेश्वरी, सानिया मिर्झा यांनी पी. टी. उषा यांचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवला. कोणत्याही बाबतीत यश मिळवण्यासाठी प्रेरणा देणे महत्वाचे असते. भारतीय महिलांना क्रीडा क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम पी. टी. उषा यांनी केले. म्हणूनच भारतीय महिला क्रीडा चळवळीच्या जनक म्हणून पी. टी. उषा यांना संबोधले तर वावगे ते ठरणार नाही.
1964 मध्ये केरळ येथे पी. टी. उषा यांचा जन्म झाला. भारतीय समाजव्यवस्थेत त्यावेळी महिलांना दुय्यम स्थान होते. लहानपणापासूनच खेळाची आवड असलेल्या उषा यांनी धावणे या क्रीडा प्रकारात भाग घेत शालेय स्तरावर अनेक प्राविण्य मिळवले. 1977 मध्ये एका स्पर्धेच्या बक्षीस वितरण या त्यावेळचे अथलेटिक्सचे नामवंत प्रशिक्षक नांबियार आणि पी. टी. उषा यांची भेट झाली. पी. टी. उषा यांच्यातील गुण नांबियार यांनी हेरले आणि त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. 400 मीटर धावणे हा त्यांचा मुख्य इव्हेंट. त्यानंतर वेगवेगळ्या वयोगटाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उषा यांनी चमकदार कामगिरी केली.
पुढे 1980 मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. भारतातर्फे सर्वात कमी वयात ऑलम्पिक खेळणारी महिला खेळाडू म्हणून त्या या स्पर्धेत सहभागी झाल्या. या स्पर्धेत त्यांची कामगिरी चांगली झाली नाही. पण त्यानंतर 1984 लॉस एंजेलिस येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये 400 मीटर धावण्यात त्यांनी अंतिम फेरीत मजल मारली. भारतातर्फे धावण्याच्या स्पर्धेत मिल्खासिंग यांच्या नंतर अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. दुर्दैवाने अंतिम फेरीतील शर्यतीमध्ये त्यांचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. पण सर्व भारतीयांना आणि विशेषता भारतीय महिलांना अभिमान वाटावी अशी कामगिरी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केली होती.
भारतीय महिलांची सामाजिक स्थिती बदलण्यासाठी ज्या चळवळी झाल्या त्यामध्ये पी. टी. उषा यांच्या रूपाने तयार झालेली क्रीडा चळवळ अत्यंत महत्त्वाची होती. 1991 पर्यंत त्यांनी भारताला आशियाई स्पर्धा, कॉमनवेल्थ स्पर्धा आणि वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवून दिली. 1991 मध्ये त्यांनी खेळातून संन्यास घेतला. सामाजिक आणि कौटुंबिक बंधनात अडकलेल्या भारतीय महिलांसाठी त्यांनी एक नवीन आदर्श निर्माण केला. महिला क्रीडा चळवळीसाठी त्यांनी पोषक वातावरण तयार केले. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, मिताली राज, कर्णम मल्लेश्वरी, सानिया मिर्झा यांनी पी. टी. उषा यांचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवला. कोणत्याही बाबतीत यश मिळवण्यासाठी प्रेरणा देणे महत्वाचे असते. भारतीय महिलांना क्रीडा क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम पी. टी. उषा यांनी केले. म्हणूनच भारतीय महिला क्रीडा चळवळीच्या जनक म्हणून पी. टी. उषा यांना संबोधले तर वावगे ते ठरणार नाही.
प्रा. श्रीनिवास पाटील
डी. आर. माने महाविद्यालय, कागल
9422415818
shrisports6@gmail.com
Best 👍👍
ReplyDelete