Skip to main content

ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव


ऑलिंपिक स्पर्धेत भारताला हॉकी या सांघिक क्रीडा प्रकारामध्ये स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पदके मिळालेली आहेत. नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाने बलाढ्य जर्मनीला नमवत कांस्यपदकाची कमाई केली. 1980 नंतर चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघाला हे पदक मिळालेले आहे. सांघिक खेळात जरी भारताला पदके मिळत असली तरी वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये भारताला अतिशय कमी पदके मिळाली आहेत. पदकांचा हा दुष्काळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू होता. गेल्या काही ऑलम्पिक स्पर्धांचा अपवाद वगळता वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये आपल्या देशाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झालेली आहे. 


स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सन 1900 च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला नॉर्मन प्रिचर्ड यांनी 200 मीटर धावणे या वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये रौप्यपदक मिळवून दिले. पण नॉर्मन प्रिचर्ड हे भारतीय नागरिक नव्हते. ब्रिटिश इंडियन ॲथलिट म्हणून ते या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामुळे भारताला जरी या स्पर्धेत पदक मिळाले असले तरी ते परदेशी नागरिकाकडून मिळालेले पदक होते.

1952 साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने भारताला पहिले वैयक्तिक क्रीडा प्रकारामधील पदक मिळाले. खाशाबा जाधव यांनी कुस्ती (फ्री स्टाइल) या क्रीडाप्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून दिले. त्याआधी खाशाबा 1948 लंडन ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झाले होते. पण दुर्दैवाने मॅटवर खेळण्याचा अनुभव नसल्यामुळे आणि प्रशिक्षणाच्या कमतरतेमुळे त्यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यावेळचे कोल्हापूर संस्थानचे राजे शहाजी दुसरे यांनी खाशाबांना आर्थिक पाठबळ दिले होते. खाशाबा त्यांच्या पायात अत्यंत चपळ होते, ज्यामुळे ते त्यांच्या काळातील इतर कुस्तीपटूंपेक्षा वेगळे होते. खाशाबांनी प्रशिक्षणादरम्यान स्वतः मध्ये असलेले हे सर्व गुण हेरले आणि 1952 च्या ऑलिम्पिक खेळांपूर्वी कठोर परिश्रम घेतले.

1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये प्राथमिक फेऱ्या जिंकल्यानंतर सेमीफायनलमध्ये खाशाबांची गाठ सोवियत युनियनच्या खेळाडूशी होती. सेमीफायनलची कुस्ती खाशाबांची कॉर्टरफायनलची कुस्ती झाल्यावर लगेचच झाली. तांत्रिकदृष्ट्या दोन कुस्त्यांमध्ये मध्ये कमीत कमी 30 मिनिटाचा विश्रांतीचा कालावधी असतो. या नियमाप्रमाणे कॉटरफायनल ची कुस्ती झाल्यानंतर खाशाबांना 30 मिनिटाचा विश्रांती कालावधी मिळणे आवश्यक होते. पण कॉर्टरफायनलची अत्यंत चुरशीची कुस्ती झाल्यावर लगेचच त्यांना सोवियत युनियनच्या खेळाडू बरोबर सेमीफायनलची कुस्ती खेळावी लागली. खाशाबांनी त्यास नकार दिला. पण दुर्दैवाने ही तांत्रिक बाजू मांडण्यासाठी भारताचा एकही ऑफिशियल त्याठिकाणी हजर नव्हता. त्यामुळे सलग कुस्त्या खेळून दमलेल्या खाशाबांना लगेचच सेमीफायनलची कुस्ती खेळावी लागली. यामध्ये त्यांचा पराभव झाला आणि भारताला स्वातंत्र्यानंतर वैयक्तिक क्रीडा प्रकारात मिळालेल्या पहिल्यावहिल्या कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

ऑलिंपिक स्पर्धेप्रमाणेच खाशाबांना त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये सुद्धा खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागले. पोलीस दलातून रिटायर झाल्यानंतर पेन्शन साठी त्यांना खूप झगडावे लागले. ज्या खेळाडुने भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले त्या खेळाडूचा भारत सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला विसर पडल्यामुळे त्यांच्या हयात त्यांना एकही क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले नाही. 1984 साली एका रोड एक्सीडेंट मध्ये त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

प्रा. श्रीनिवास पाटील
डी. आर. माने महाविद्यालय, कागल
9422415818
shrisports6@gmail.com

Comments

Popular posts from this blog

फ्लाइंग सिख - मिल्खा सिंग

जगाच्या क्रीडा व्यासपिठावर भारताची दखल घेण्यास भाग पाडणारे ॲथलिट म्हणून मिल्खा सिंग यांचे नाव घ्यावे लागेल. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कामगिरी फारशी चांगली नव्हती, त्यावेळी वेगवान धावपटू मिल्खासिंग यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे साऱ्या जगाची भारतीय क्रीडाक्षेत्राकडे बघण्याची दृष्टी बदलली. संपूर्ण क्रीडाक्षेत्रात एक सच्चा देशभक्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. 'भाग मिल्खा भाग' हा त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आपणास आपणा सर्वांना माहीत आहेच. 1947 देशाच्या फाळणी वेळी झालेल्या दंगलीमध्ये त्यांच्या सर्व कुटुंबीयांची डोळ्यादेखत झालेली हत्या ही भयानक आठवणी घेऊन ते स्वतःचा जीव वाचवत दिल्लीतील निर्वासितांच्या छावणीत दाखल झाले. एक ग्लास दुधासाठी ते सेनादलातर्फे आयोजित धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले आणि भारताला धावपटूच्या स्वरूपात एक हिरा मिळाला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय त्यांनी 200 मी. आणि 400 मी. धावण्यामध्ये अत्यंत कमी कालावधीत प्राविण्य मिळविले. 1954 ते 1964 दरम्यान आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, जागतिक अज...

भारतीय क्रिकेटचा बादशाह - कपिल देव

मेजर ध्यानचंद, खाशाबा जाधव यांच्या नंतर 1950 ते 1990 पर्यंत अनेक नामवंत खेळाडू होऊन गेले. यामध्ये फुटबॉलचे सय्यद अब्दुल रहीम, ऍथलेटिक्सचे फ्लाइंग सिख मिल्खा सिंग, गोल्डन गर्ल पी.टी. उषा, टेनिसचे रामनाथन कृष्णन, जलतरणातील मिहिर सेन, हॉकीमधील असलम शेरखान, अजित पाल, बॅडमिंटनचे प्रकाश पदुकोण, क्रिकेटमधील टायगर पतौडी, फारूक इंजिनियर, सुनील गावस्कर यांची नावे घेता येतील. पण खऱ्या अर्थाने ज्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलला ते म्हणजे भारताच्या पहिल्या विश्वचषक क्रिकेट विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव. अवघ्या 24 वर्षाचे असताना त्यांनी भारतीय संघाला त्यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकून दिला आणि भारतीय क्रिकेटला एक नवी दिशा मिळाली.  वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला 1983 साली अंतिम सामन्यात पराभूत करून भारतीय संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. पण या विश्वचषक स्पर्धेअगोदर भारतीय संघाने वेस्टइंडीजचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये भारतीय संघाने अतिशय चांगली कामगिरी करून वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला आपण टक्कर देऊ शकतो हा आत्मविश्वास प्राप्त केला ...

लिओनल मेस्सी

  फुटबॉलमधील प्रतिष्ठेचा समजला जाणारा बॅल न डी ’ ऑर पुरस्कार पाचवेळा जिंकत ज्याने तमाम फुटबॉल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले तो महान खेळाडू म्हणजे लिओनल मेस्सी . 2005 पासून व्यावसायिक फुटबॉलमध्ये स्वतःची कारकीर्द सुरू करणाऱ्या या खेळाडूने गेल्या सतरा वर्षात फुटबॉलमध्ये सर्व काही कमावले . फक्त कमी होती ती विश्वचषकाची . रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात बलाढ्य फ्रान्सला पराभूत करत मेस्सी ने विश्वचषक उंचावत ही कमतरता सुद्धा पूर्ण केली . फुटबॉल प्रेमींसाठी मेस्सी नेहमीच सर्वोत्तम होता . पण विश्वचषक उंचावल्यानंतर तो महानतेच्या सर्वोत्तम उंचीवर गेला . विश्वचषक उंचावण्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अंतिम सामन्यात 120 मिनिट मेहनत घेतली असली तरी त्याचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तो गेली सतरा वर्षे मेहनत घेत होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मेस्सी ची फुटबॉल कारकीर्द वयाच्या आठव्या वर्षी सुरु झाली . त्याचे वडील एका स्थानिक क्लबला कोचिंग करायचे . घरातच फुटबॉलचे बाळकडू मिळाल्यामुळे त्याला फुटबॉलची आवड लागली . तो स्थानिक क्...