Skip to main content

आधुनिक ऑलिंपिक स्पर्धा


आधुनिक ऑलिंपिक स्पर्धेची सुरुवात 1896 साली झाली. अथेन्समधील पॅनाथेनाइको स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या नेतृत्वाखाली पहिल्या ऑलिंपिक स्पर्धेच्या खेळांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये 14 देशातील 241 खेळाडू सहभागी झाले आणि त्यांनी 43 क्रीडा प्रकारांसाठी एकमेकांबरोबर स्पर्धा केली. फ्रेंच शिक्षक बॅरोन पियर दि कुबर्टिन यांना आधुनिक ओलंपिकचे जनक असे संबोधले जाते. त्यांच्या प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेची बांधणी झाली आणि आधुनिक ऑलम्पिक स्पर्धेची सुरुवात होण्यास मदत झाली.

दर चार वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. पहिल्या महायुद्धाच्या कारणामुळे 1916 साली आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कारणामुळे 1940 आणि 1944 साली या स्पर्धा झाल्या नाहीत. पण त्यानंतर या स्पर्धेमध्ये कधीही खंड पडलेला नाही.

Citius-Altius-Fortius म्हणजेच अधिक वेगवान, अधिक उंच आणि अधिक बलवान हे ऑलिंपिकचे बोधवाक्य आहे. जगातील सर्व देशातील खेळाडूंनी एकत्र येऊन स्पर्धेच्या माध्यमातून जागतिक एकात्मता व बंधुता वाढवावी, व्यक्तिमत्व आणि शारीरिक सक्षमता विकसित करावी, देशभक्तीची भावना वाढावी आणि स्पर्धेच्या माध्यमातून शारीरिक शिक्षण आणि खेळ यांचा विविध देशात प्रसार वाढवणे हा आधुनिक ऑलिम्पिक चळवळीचा मुख्य उद्देश आहे.

युरोप,आफ्रिका,आशिया,ओशियाना आणि अमेरिका या पाच प्रातिनिधिक खंडांना एकमेकांमध्ये एकतेच्या आणि बंधुतेच्या माध्यमातून एकमेकांमध्ये कायम गुंफून ठेवणे आणि त्या माध्यमातून जागतिक शांतता प्रस्थापित करणे हा सुद्धा ऑलम्पिक चळवळीचा एक उद्देश आहे.

बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण,  स्पर्धेमध्ये होणारा उत्तेजित द्रव्यांचा वापर, वंशभेद, स्त्री-पुरुषांमधील भेदभाव, युद्ध आणि अतिरेकी हल्ला अशा विविध कारणांमुळे काही देशांनी काही वेळेला स्पर्धेवर बहिष्कार टाकला. तरीसुद्धा या सर्व अडथळ्यांवर मात करत आधुनिक ऑलिंपिक स्पर्धा आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे.

प्रा. श्रीनिवास पाटील
डी. आर. माने महाविद्यालय, कागल
9422415818
shrisports6@gmail.com

Comments

Popular posts from this blog

फ्लाइंग सिख - मिल्खा सिंग

जगाच्या क्रीडा व्यासपिठावर भारताची दखल घेण्यास भाग पाडणारे ॲथलिट म्हणून मिल्खा सिंग यांचे नाव घ्यावे लागेल. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कामगिरी फारशी चांगली नव्हती, त्यावेळी वेगवान धावपटू मिल्खासिंग यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे साऱ्या जगाची भारतीय क्रीडाक्षेत्राकडे बघण्याची दृष्टी बदलली. संपूर्ण क्रीडाक्षेत्रात एक सच्चा देशभक्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. 'भाग मिल्खा भाग' हा त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आपणास आपणा सर्वांना माहीत आहेच. 1947 देशाच्या फाळणी वेळी झालेल्या दंगलीमध्ये त्यांच्या सर्व कुटुंबीयांची डोळ्यादेखत झालेली हत्या ही भयानक आठवणी घेऊन ते स्वतःचा जीव वाचवत दिल्लीतील निर्वासितांच्या छावणीत दाखल झाले. एक ग्लास दुधासाठी ते सेनादलातर्फे आयोजित धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले आणि भारताला धावपटूच्या स्वरूपात एक हिरा मिळाला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय त्यांनी 200 मी. आणि 400 मी. धावण्यामध्ये अत्यंत कमी कालावधीत प्राविण्य मिळविले. 1954 ते 1964 दरम्यान आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, जागतिक अज...

भारतीय क्रिकेटचा बादशाह - कपिल देव

मेजर ध्यानचंद, खाशाबा जाधव यांच्या नंतर 1950 ते 1990 पर्यंत अनेक नामवंत खेळाडू होऊन गेले. यामध्ये फुटबॉलचे सय्यद अब्दुल रहीम, ऍथलेटिक्सचे फ्लाइंग सिख मिल्खा सिंग, गोल्डन गर्ल पी.टी. उषा, टेनिसचे रामनाथन कृष्णन, जलतरणातील मिहिर सेन, हॉकीमधील असलम शेरखान, अजित पाल, बॅडमिंटनचे प्रकाश पदुकोण, क्रिकेटमधील टायगर पतौडी, फारूक इंजिनियर, सुनील गावस्कर यांची नावे घेता येतील. पण खऱ्या अर्थाने ज्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलला ते म्हणजे भारताच्या पहिल्या विश्वचषक क्रिकेट विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव. अवघ्या 24 वर्षाचे असताना त्यांनी भारतीय संघाला त्यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकून दिला आणि भारतीय क्रिकेटला एक नवी दिशा मिळाली.  वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला 1983 साली अंतिम सामन्यात पराभूत करून भारतीय संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. पण या विश्वचषक स्पर्धेअगोदर भारतीय संघाने वेस्टइंडीजचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये भारतीय संघाने अतिशय चांगली कामगिरी करून वेस्टइंडीज सारख्या बलाढ्य संघाला आपण टक्कर देऊ शकतो हा आत्मविश्वास प्राप्त केला ...

लिओनल मेस्सी

  फुटबॉलमधील प्रतिष्ठेचा समजला जाणारा बॅल न डी ’ ऑर पुरस्कार पाचवेळा जिंकत ज्याने तमाम फुटबॉल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले तो महान खेळाडू म्हणजे लिओनल मेस्सी . 2005 पासून व्यावसायिक फुटबॉलमध्ये स्वतःची कारकीर्द सुरू करणाऱ्या या खेळाडूने गेल्या सतरा वर्षात फुटबॉलमध्ये सर्व काही कमावले . फक्त कमी होती ती विश्वचषकाची . रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात बलाढ्य फ्रान्सला पराभूत करत मेस्सी ने विश्वचषक उंचावत ही कमतरता सुद्धा पूर्ण केली . फुटबॉल प्रेमींसाठी मेस्सी नेहमीच सर्वोत्तम होता . पण विश्वचषक उंचावल्यानंतर तो महानतेच्या सर्वोत्तम उंचीवर गेला . विश्वचषक उंचावण्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अंतिम सामन्यात 120 मिनिट मेहनत घेतली असली तरी त्याचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तो गेली सतरा वर्षे मेहनत घेत होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मेस्सी ची फुटबॉल कारकीर्द वयाच्या आठव्या वर्षी सुरु झाली . त्याचे वडील एका स्थानिक क्लबला कोचिंग करायचे . घरातच फुटबॉलचे बाळकडू मिळाल्यामुळे त्याला फुटबॉलची आवड लागली . तो स्थानिक क्...